shabd-logo

मित्रमेळ्याचा पहिला मोठा गणेशोत्सव _ बखर सावरकर

22 अगस्त 2022

14 बार देखा गया 14

 सन १९०१ सालच्या मित्रमेळाचा गणेशोत्सव फारच मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तात्यारावांचे सहकारी त्रिंबक, वामन आणि शंकर या तरुणांनी याकरिता मेहनत घेतली. मित्रमेळ्यात येणाऱ्या तरुणांची कर्तृत्वशक्ती आणि वक्तृत्वशक्ती वाढत होती. गोविंद कवींनी गणेशोत्सवासाठी स्वतंत्र पदे रचली. या गोविंदकवींनी राम रावणाचे अत्यंत तेजस्वी संवाद आपल्या काव्यात गुंफले. ते ऐकत असताना हजारो प्रेक्षकांचे बाहू थरारून जात. रावणाचे भारतवर्षाच्या मूर्तिमंत लक्ष्मीस अपहरणारे उद्दामपण आणि रामाने त्याच्या दहा शिरांचा शिरच्छेद करून उगवलेला सूड यांची वर्णने अशा भाषेत जुळवली जात की, ऐकताच ती सीतालक्ष्मी म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मी हे सांगितल्याशिवाय समजावे. कोण राम, कोण रावण, सशस्त्र युद्धात शिरच्छेद झाल्यावाचून कोण शुद्धीवर येणार नाही ते मनामनात जाणून त्याने चित्तवृत्ती भडकाव्यात.


मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठकीत जे विषय तात्याराव मांडत त्याच विषयांवर आणि विचारांवर गोविंदकवी मोठ्या कुशलतेने सुंदर व तेजस्वी पदे रचित. ती पदे जितकी मार्मिक आणि प्रभावशाली असत तितकीच परिणामकारी अभिनय करून ती मोहक सुरात म्हणणारी मुलेही तयार झाली. ती मुले ती पदे नुसती पाठ करून म्हणणारी नसत, तर त्यांच्या मनात देखील तशीच तळमळ निर्माण झालेली असे. कवी इतकेच प्रभावीपणे ही मुले ही पदे सदर करत. दुःख, तेज, उत्कटता, करुण, क्रोध प्रत्यक्ष त्या मुलांच्या मनातून अभिनयात उतरे. सुरुवातीस ही केवळ तीन चार मुलेच होती. त्यात तात्यारावांचा धाकटा भाऊ बाळ, केतकरांचा दत्तू, जोशींचा बापू आणि वर्तकांचा श्रीधर असे.


पुढे पुढे तात्यारावांनी लिहिलेला सिंहगडचा पोवाडा, बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा, गोविंदकवींनी लिहिलेला अफजलखानच्या वधाचा पोवाडा आणि इतर अनेक पदे आणि संवाद बसवून या मुलांनी महाराष्ट्रभर सादर केला. पुढच्या पाच सात वर्षात महाराष्ट्रातील सहस्त्रावधी लोक, नगरेच्या नगरे ह्या ‘अभिनव भारताच्या’ या तेजस्वी कुमारांच्या तोंडच्या ह्या प्रभावी पदांवर लुब्ध होऊन गेलेली होती. सहस्त्रावधी लोकांच्या हृदयात देशभक्ती आणि राष्ट्रस्वातंत्र्याची ज्योत ह्या मुलांची ही पदे ऐकताच पेटवी. बाहूंत आवेश निर्माण व्हावा.


आता नाशिकच्या प्रौढ आणि पुढारी वर्गातही मित्रमेळ्याच्या कार्यक्रमांची चर्चा होऊ लागली होती. त्यातील अनेकजण मित्रमेळाचे सभासद होत होते. संस्थेच्या उद्देशानुसार नाशिकच्या बहुतेक राजकीय चळवळी मित्रमेळ्याच्या हातात आलेल्या होत्या. सार्वजनिक सभा मित्रमेळ्याच्या पुढाऱ्यांच्या सहकाऱ्यांनेच झाली तर बहुदा यशस्वी होई. आणि मित्रमेळ्याचे सहकार्य इंग्रजांच्या हांजीखोर उद्देशास आणि ठरवांस मिळणे शक्य नसल्याने नाशिकची राजकीय भाषा, सार्वजनिक ठराव सभांतून पुण्यापेक्षाही कडक आणि ठसठसीत झाली होती.

--*--

(c) आदित्य अनिल रुईकर Advocate


5
रचनाएँ
वीर सावरकर
0.0
यह पुस्तक श्री वीर सावरकर के बारे में है
1

Veer sawarkar

21 अगस्त 2022
0
0
0

*भाग ४१ ते ४५**बखर_सावरकरांची:* भाग ४१ (१०/०७/२०२२)दोन महिने उलटून गेले तरी नाशिक मधून प्लेग हटेना. त्यामुळे तात्यारावांच्या मामाने या सगळ्या मुलांना नाशिक सोडून कोठूरला आजोळी यावे म्हणून तगादा लावला.

2

एओ ह्यूम, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 'पिता' प्रथम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, 1885

21 अगस्त 2022
0
0
0

एओ ह्यूम, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 'पिता' प्रथम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, 1885 के नटवर सिंह लेखक भारत के पूर्व विदेश मंत्री हैं। जिस व्यक्ति ने कांग्रेस की स्थापना की पहल की वह एक सेवानिवृत्त आईस

3

We The People Are The Nation

22 अगस्त 2022
0
0
0

Nobody talks better about what India has achieved than Palki Sharma Upadhayay does. Having said that, I would like to bring my experience to what India has achieved through this post.I see a lot of pe

4

स्वर्ग से सुंदर जहां

22 अगस्त 2022
0
0
0

देहरादून में एक वार्षिक साहित्य और कला उत्सव, जहां वह वर्तमान में अठारहवीं शताब्दी के उत्तरार्ध में रहता है, इंग्लैंड ने औद्योगिक क्रांति के लिए अपना सब कुछ खो दिया था: जैसे कि रॉयल आर्मडा और वाणिज्यि

5

मित्रमेळ्याचा पहिला मोठा गणेशोत्सव _ बखर सावरकर

22 अगस्त 2022
0
0
0

 सन १९०१ सालच्या मित्रमेळाचा गणेशोत्सव फारच मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तात्यारावांचे सहकारी त्रिंबक, वामन आणि शंकर या तरुणांनी याकरिता मेहनत घेतली. मित्रमेळ्यात येणाऱ्या तरुणांची कर्तृत्वशक्ती आणि व

---

किताब पढ़िए

लेख पढ़िए